
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिर वरून एक खोटा दावा व्हायरल होत आहे. काही लोकं व्हायरल होत असलेल्या छायाचित्रावरून दावा करत आहेत कि राम मंदिर चे बारा खांब पडले.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला असता, ती खोटी असल्याचे समजले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर अशोक कुमार सिंह ने २७ डिसेंबर रोजी एक पोस्ट लिहून दावा केला: ‘अयोध्या : श्रीराम मंदिर के 12 खम्बे गिर गए। भगतों पता तो करो नींव किस मनहूस ने रखी थी।’
पोस्ट ला खरे समजून, बाकी यूजर देखील त्याला शेअर करत आहेत.
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने आपल्या पोस्ट च्या तपासाची सुरुवात, गूगल सर्च ने केली. आम्ही काही संबंधित कीवर्डस चा वापर करून जाणून घेतले कि अशी कुठली बातमी आम्हाला सापडते का. आम्हाला अशी एक पण बातमी आमच्या तपासात सापडली नाही, जी व्हायरल दाव्यांचे खरे असल्याची पुष्टी करील.
सध्या कीवर्ड सर्च ने आम्हाला दैनिक जागरण च्या वेबसाईट वर बातमी सापडली. ३० डिसेंबर रोजी प्रकाशित झालेल्या बातमीत सांगितले होते कि ‘राम मंदिर ची निव कंटीन्यूअस राफ्ट स्टोन प्रणाली द्वारा तयार करण्यात येत आहे, म्हणजे हे स्पष्ट आहे कि, ज्या मंदिराची अजून निवच तयार नाही आहे, त्याचे खांब पडल्याची बातमी खोटीच असेल. हि बातमी तुम्ही इथे सविस्तर वाचू शकता.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने श्रीरामजन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट चे सदस्य बिमलेंद्र मोहन मिश्र यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि राम मंदिराचे खांब पडले हि सांगणारी घटना खोटी आहे.
आम्ही हि खोटी पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर च्या अकाउंट चा तपास केला ज्याने हि पोस्ट शेअर केली. आम्हाला कळले कि यूजर उत्तर प्रदेश च्या सलेमपूर चे रहिवासी आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात अयोध्याच्या राम मंदिरचे खांब पडल्याची गोष्ट खोटी असल्याचे समजले.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.