Fact Check: सुरेश भैय्याजी जोशी यांनी नाही केले संविधान बदलण्याबद्दल हे विधान, व्हायरल पोस्ट खोटी आहे
विश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले कि सुरेश भैय्याजी जोशी यांनी असे वक्तव्य केले नाही. व्हायरल करण्यात येत असलेली पोस्ट खोटी आहे.
- By Vishvas News
- Updated: March 27, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे पूर्व सरकार्यवाह सुरेश भैय्याजी जोशी यांच्या नावावर एक विधान व्हायरल होत आहे. त्यात असे सांगितले गेले आहे कि जोशी म्हणत आहेत कि त्यांचा उद्देश्य एक हिंदू राष्ट्र बनवणे आहे आणि त्याकरता एक वर्ण-व्यवस्था ओलागू करावी लागेल आणि तसेच संविधान देखील बदलावे लागेल. विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि सुरेश भैय्याजी जोशी यांनी असे म्हंटले नाही. व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज ‘नास्तिकता के संग, पाखंड के खिलाफ जंग’ वर यूजर ‘ग्रुरु प्रकाश भारती’ ने एक पोस्ट शेअर केली, ज्यात सुरेश भैय्याजी जोशी यांचे छायाचित्र होते आणि सोबत लिहले होते, “भारत को हिन्दू राष्ट्र बनाने के लिए वर्ण व्यवस्था को लागू करना और संविधान को बदलना हमारा उद्देश्य है!” मा. सरकार्यवाह सुरेश (भैय्याजी) जोशी का वक्तव्य“
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
तपासाच्या सुरुवातीला आम्ही सगळ्यात आधी कीवर्डस वापरून गूगल न्यूज सर्च करून शोधून बघितले कि व्हायरल पोस्ट मधले विवादित वाक्य खरंच सुरेश भैय्याजी जोशी यांनी म्हंटले आहे का. जर का त्यांनी असे म्हंटले असते तर हे बातम्यांमध्ये नक्कीच आले असते. सर्च मध्ये आम्हाला सुरेश भैय्याजी जोशी यांच्यासोबत संबंधित एक पण बातमी मिळाली नाही, जी व्हायरल पोस्ट ला खरे सिद्ध करेल.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह प्रचार प्रमुख नरेंदर कुमार यांच्या सोबत संपर्क केला. त्यांच्यासोबत आम्ही हि पोस्ट शेअर केली, त्यांनी सांगितले कि भैय्याजी जोशी यांनी असे कुठलेच विधान केले नाही. हि चुकीची माहिती आहे आणि तसेच संघाचे हे मत कधीच नव्हते.
खोटी पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर गुरु प्रकाश भारती यांची सोशल स्कॅनिंग केले असता त्यात आम्हाला कळले कि त्यांना ४४३४ लोकं फॉलो करतात. यूजर पंजाब च्या अमृतसर चे रहिवासी आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले कि सुरेश भैय्याजी जोशी यांनी असे वक्तव्य केले नाही. व्हायरल करण्यात येत असलेली पोस्ट खोटी आहे.
- Claim Review : भारत को हिन्दू राष्ट्र बनाने के लिए वर्ण व्यवस्था को लागू करना और संविधान को बदलना हमारा उद्देश्य है!
- Claimed By : गुरु प्रकाश भारती
- Fact Check : False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
-
Whatsapp 9205270923
-
Telegram 9205270923
-
Email-Id contact@vishvasnews.com