Fact Check: हे छायाचित्र वाराणसी चे नाही, त्रिपुरा ची राजधानी अगरतला चे जुने चित्र आहे
वर्ष 2017 मध्ये खूप पाऊस झाला त्यामुळे त्रिपुरा ची राजधानी अगरतला मध्ये पाणी भरले आणि आता वाराणसी च्या नावावर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हे चित्र व्हायरल होत आहे.
- By Vishvas News
- Updated: August 16, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका चित्रात दावा करण्यात येत आहे कि हे चित्र उत्तर प्रदेश मधील वाराणसी चे आहे, जिथे पाऊसामुळे शहरात पाणी साचले आणि पूर स्थिती बनली. चित्रात एक व्यक्ती तलावासारख्या दिसणाऱ्या रस्त्यावर चालताना दिसतो.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समजले. व्हायरल होत असलेले चित्र उत्तर प्रदेश मधील वाराणसी चे नाही तर त्रिपुरा चे जुने चित्र आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Arman Rana’ यांनी व्हायरल होत असलेले चित्र शेअर केले (आर्काइव लिंक) आणि लिहले: ”#यूपी के “स्मार्ट सिटी” #वाराणसी में
अच्छा हुआ ये आदमी घर से #छाता लेकर निकला था।
वरना बेचारा भीग जाता।।”
हे छायाचित्र विविध प्लॅटफॉर्म्स वर व्हायरल होत आहे आणि अन्य यूजर देखील मिळत्या जुळत्या दाव्यासह ह्या चित्राला शेअर करत आहेत. ट्विटर वर देखील बऱ्याच यूजर्स ने हे चित्र शेअर केले.
तपास:
सोशल मीडिया सर्च मध्ये आम्हाला हे चित्र बऱ्याच यूजर्स च्या प्रोफाइल वर मिळाले. ह्यावरून हे स्पष्ट झाले कि हे चित्र आधी देखील सोशल मीडिया वर व्हायरल झाले असावे.
व्हायरल होत असलेल्या चित्रातील दाव्याच्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गूगल रिव्हर्स इमेज ची मदत घेतली. सर्च मध्ये आम्हाला हे चित्र climatenexus.org च्या वेबसाईट वर २०१७ मध्ये प्रकाशित एका रिपोर्ट मध्ये मिळाले. छायाचित्रात दिसत असलेले बर्रीकॅड देखील या चित्रात दिसत आहे.

यानंतर आम्ही खरे चित्र शोधण्यासाठी परत गूगल रिव्हर्स इमेज टूल ची मदत घेतली सर्च केल्यानंतर हे चित्र आम्हाला, गेटी इमेज च्या वेबसाईट वर मिळाली.

दिलेल्या माहिती प्रमाणे, हे चित्र 11 ऑगस्ट 2017 चे आहे, जेव्हा पाऊसामुळे त्रिपुरा ची राजधानी अगरतला मध्ये पाणी भरले आणि बिकट परिस्थितीत निर्माण झाली.
वाराणसी मध्ये वेळो वेळी पाणी भारत राहते. व्हायरल चित्र आम्ही आमचे सहयोगी दैनिक जागरण चे वाराणसी चे रिपोर्टर, शाश्वत मिश्र यांच्यासोबत संपर्क केला. शाश्वत ने व्हायरल दाव्याचे खंडन केले आणि सांगितले कि हे चित्र वाराणसी चे नाही.
व्हायरल चित्र दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर करणाऱ्या यूजर ची स्कँनिंग केली. फेसबुक वर या यूजर ला 800 लोकं फॉलो करतात. आपल्या प्रोफाइल वर ते समाजीकी कार्यकर्ते आहे असे त्यांनी सांगितले.
निष्कर्ष: वर्ष 2017 मध्ये खूप पाऊस झाला त्यामुळे त्रिपुरा ची राजधानी अगरतला मध्ये पाणी भरले आणि आता वाराणसी च्या नावावर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हे चित्र व्हायरल होत आहे.
- Claim Review : वाराणसी चे छायाचित्र
- Claimed By : FB User-Arman Rana
- Fact Check : Misleading

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
-
Whatsapp 9205270923
-
Email-Id contact@vishvasnews.com