Fact Check: नवज्योत सिद्धू ने अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्या संदर्भात हे विधान केलेले नाही, Fake पोस्ट व्हायरल
भारत आणि ऑस्ट्रेलिया सिरीज चालू असतानाच टीम इंडियाचे माजी क्रिकेटर आणि लोकप्रिय कमेंटेटर नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावावर एक पोस्ट व्हायरल होत आहे.
- By: Jyoti Kumari
- Published: Oct 30, 2025 at 09:20 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज)। भारत आणि ऑस्ट्रेलिया सिरीज चालू असतानाच टीम इंडियाचे माजी क्रिकेटर आणि लोकप्रिय कमेंटेटर नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये धावा केला गेला आहे की नवज्योतसिंग सिद्धू यांनी बीसीसीआयला सांगितले, ” जर भारताला 2027 चा वर्ल्डकप जिंकायचा असेल तर, अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांना काढून रोहित शर्माला कर्णधार केले पाहिजे.” काही काही युजर्स याला खरी बातमी म्हणून शेअर करत आहेत.
विश्वास न्यूजने या बातमीची पडताळणी केली असता असे आढळले की नवज्योत सिंग सिद्धू यांनी अशा प्रकारचे कोणतेही विधान केलेले नाही. सोशल मीडियावर नवज्योत सिंग सिद्धू यांचे नावावर हे खोटे विधान शेअर केले जात आहे. स्वतः त्यांनी पोस्ट शेअर करत या दाव्याचे खंडन केले आहे.
व्हायरल पोस्ट
फेसबुक यूजर Cricket Hub ने 19 ऑक्टोबर 2025 ला एक व्हायरल पोस्ट (आर्काइव लिंक) शेअर करत लिहिले, ” नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले- जर भारताला 2027 चा एक दिवसीय विश्व कप स्पर्धा जिंकायची असेल तर, बीसीसीआयने लवकरच अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांना बाजूला करून पूर्ण सन्मानासह रोहित शर्माला कर्णधारपद दिले पाहिजे.”

तपासणी
व्हायरल पोस्टची पडताळणी करण्यासाठी आम्ही यासंदर्भात गुगलवर कीवर्ड द्वारे तपास केला. आम्हाला व्हायरल पोस्ट संदर्भातील अनेक मीडिया रिपोर्ट मिळाले. tv9hindi.com tv9hindi.com या वेबसाइट वर व्हायरल झालेल्या दाव्यासंदर्भात एक बातमी मिळाली. 20 ऑक्टोबर 2025 ला प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, सोशल मीडियावर नोटीसिंग सिद्धू यांच्या नावे एक फेक पोस्ट व्हायरल झाली होती. पोस्टमध्ये सिद्धू यांचे नावे एक खोटे विधान जोडले गेले. ज्यामध्ये दावा केला गेला की ” नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले- जर भारताला 2027 चा एक दिवसीय विश्व कप स्पर्धा जिंकायची असेल तर, बीसीसीआयने लवकरच अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांना बाजूला करून पूर्ण सन्मानासह रोहित शर्माला कर्णधारपद दिले पाहिजे.” ही पोस्ट व्हायरल झालेली बघून नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक्स वर एक पोस्ट शेअर केली आणि या खोट्या विधानाचे खंडन केले.
तपासणी करत असतांना आम्हाला या पोस्ट संदर्भातील इतर बातम्या मिळाल्या, ज्यामधील दाव्यांना खोट्या बातम्या म्हणून सांगितले गेले आहे.
या तपासाला पुढे नेत आम्ही नवज्योत सिंग सिद्धू यांच्या सोशल मीडिया हँडलवर सर्च केले. आम्हाला सिद्धू यांच्या व्हेरिफाइड एक्स हॅण्डल वर एक पोस्ट मिळाली. 20 ऑक्टोबर २०२५ ला केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,”Never said it , don’t spread fake news ,never imagined it. Shame on you https://x.com/jod_insane/sta/jod_insane/status/1979883365655539996” (मराठी अनुवाद: असे कधीही म्हटले नाही, चुकीच्या बातम्या पसरवू नका, मी अशी कधीही केलेली नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे.)
यासंदर्भात दैनिक जागरण चे क्रीडा संपादक अभिषेक त्रिपाठी यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना व्हायरल मेसेज पाठवला. त्यांनी याला फेक म्हणून सांगितले. त्यांनी म्हटले की नवज्योत सिंग सिद्धू यांनी अशा प्रकारचे कोणतेही विधान केलेले नाही.
शेवटी आम्ही व्हायरल पोस्ट करणाऱ्या युजरचे प्रोफाइल ला स्कॅन केले. आम्हाला माहिती झाले की युजरचे जवळपास 6 हजार फॉलोवर्स आहेत.
आधी सुद्धा अनेक क्रिकेटर च्या नावाने सोशल मीडियावर खोटी विधाने व्हायरल झालेली आहेत. ज्याची तपासणी विश्वास न्यूज च्या वेबसाइट वर वाचता येऊ शकते.
निष्कर्ष: विश्वास न्यूज ला तपासणीमध्ये सदर व्हायरल दावा खोटा आढळला. नवज्योत सिंग सिद्धू यांनी अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्या संदर्भात असा कोणताही प्रकारचा दावा केलेला नाही. नवज्योत सिंग सिद्धू यांनी स्वतः पोस्ट करून या व्हायरल दाव्याचे खंडन केले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या नावे व्हायरल केलेले विधान खोटे आहे.
- Claim Review : सिद्धू यांनी म्हटले की अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांना हटवून रोहित शर्मा ला कर्णधारपद दिले पाहिजे.
- Claimed By : फेसबुक यूजर -Cricket Hub
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.











