
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात, एका रस्त्यावर हजारो लोकं बसलेले दिसतात. यूजर्स दावा करत आहेत कि हे छायाचित्र दिल्ली मध्ये होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. आम्हाला आमच्या तपासात कळले कि महाराष्ट्रातील एक जुने छायाचित्र, लोकं दिल्ली चे सांगून व्हायरल करत आहे. आमच्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे कळले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Irfan Uddin ने कन्हैय्या कुमार नावाच्या एका ग्रुप वर छायाचित्र पोस्ट केले आणि याला दिल्ली चे सांगून लिहले: ‘आज की ऎतिहासिक तस्वीर’
या छायाचित्राला खरे मानून दुसरे यूजर्स देखील सोशल मीडिया वर व्हायरल करत आहेत.
फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघू शकता.
तपास:
विश्वास न्यूज ने दिल्ली च्या नावावर व्हायरल होत असलेल्या छायाचित्राला गूगल रिव्हर्स इमेज मध्ये अपलोड केले आणि सर्च केले. सर्च च्या वेळी आम्हाला खरे छायाचित्र मुंबई लाईव्ह नावाच्या ट्विटर हॅन्डल वर मिळाले. याला १० मार्च २०१८ रोजी अपलोड केले होते. छायाचित्राबद्दल सांगण्यात आले आहे कि शेतकऱ्यांच्या विरोधात आलेल्या कायद्यांच्या विरोधात जवळपास २५ हजार शेतकरी ठाण्याच्या ईस्टर्न एक्सप्रेस हाईवाय वर एकवटले होते. ओरिजिनल छायाचित्र इथे बघा.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही परत गूगल रिव्हर्स इमेज टूल ची मदत घेतली. बरेच कीवर्डस वापरून सर्च केल्यावर आम्हाला काही बातम्या मिळाल्या ज्यातून समजले कि, नाशिक पासून मुंबई पर्यंत मार्च २०१८ मध्ये एक मार्च काढल्या गेली. या मार्च ला ऑल इंडिया किसान सभा नि काढले होते. पाच मार्च ला नाशिक वरून निघालेले शेतकरी आणि १२ मार्च रोजी मुंबई येथे पोहोचले. आऊटलूक च्या वेबसाईट वर प्रकाशित बातमी तुम्ही इथे वाचू शकता.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही अखिल भारतीय किसान सभा चे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन एडे यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि मार्च २०१८ मध्ये शेतकऱ्यांचे मागण्यांना घेऊन रॅली काढली गेली होती. त्यांनी संपूर्ण राज्यात अश्या रॅली निघत असल्याचे सांगितले.
शेवटी आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या फेसबुक यूजर इरफान चे तपास केले. आम्हाला कळले कि यूजर कलकत्ताचे रहिवासी आहेत. या अकाउंट ला जुलै २०१३ रोजी बनवले गेले होते.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि दिल्ली च्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या नावावर व्हायरल होत असलेले पोस्ट खोटे आहे. मार्च २०१८ मध्ये ठाण्यातील एका रॅली चे छायाचित्र काही लोकं आत्ताचे सांगून व्हायरल करत आहेत.
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.